Posts

मुक्त चिंतन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

Image
  सर्वप्रथम आमच्या समस्त वाचकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनेक शुभेच्छा ! परिस्थितीची अनुकूलता आणि प्रतिकूलता या मानवी आयुष्याच्या महत्वाचा घटक आहेत. बरेचजण अश्या प्रतिकूल परिस्थितीपुढे हतबुद्ध होतात आणि परिस्थितीला शरण जातात. महाकाय प्रतिकूलतेच्या छाताडावर पाय रोवून जे स्वतःचे तेज प्रकट करू शकतात ते आणि तेच या समाजाचा उद्धार करू शकतात.  पण असे करण्याकरता विलक्षण मनःसामर्थ्य आणि झुंझार मनोवृत्ती असावी लागते त्याशिवाय संकटांवर मात करण्याची शक्ती प्राप्त होत नाही.  अश्याच झुंझार व्यक्तिमत्वातील एक अग्रणी नाव म्हणजे, डॉ.भीमराव रामजी आंबेडकर हे होय.  शूद्रातिशूद्र समजल्या गेलेल्या आणि हजारो वर्षांच्या अन्यायाने भरडून निघालेल्या, सदैव आर्थिक सामाजिक आणि धार्मिक मागासलेपणाचा मानवनिर्मित शाप लाभलेल्या ज्ञातीमध्ये जन्म घेतलेले डॉ.आंबेडकर जेंव्हा विश्ववंदनीय ठरतात तेंव्हा त्याला चमत्कार म्हणावे असे वाटते. पण हा काही कपोलकल्पित जादूची कांडी फिरवून घडलेला चमत्कार नव्हता तर त्यामागे कठोर, खडतर अशी तपश्चर्या होती. समाजाचा उद्धार करण्याकरता स्वतःच्या आयुष्याचा केलेला तो होम होता.  डॉ.आंबेडकर

शुभ सकाळ (उत्तरार्ध )

   ........ डॉ. राकेशने तात्काळ आपली बॅग उचलली आणि निसरड्या वाटेवरून झपाझप पावले टाकीत, काहीसे धापा टाकतच रंगरावांच्या घरी पोहोचले, तपासणी करताना लक्षात आले की हा सौम्य हृदयविकाराचा झटका आहे. अश्या रुग्णांना आवश्यक सुविधा केंद्रात उपलब्ध नव्हती, आणि तालुक्याहुन ऍम्ब्युलन्स वेळेत पोहोचण्याची शक्यता पण कमी होती .... त्यांनी सांगितले की; " मोठ्या गाडीची करावी लागेल, यांना तालुक्याला न्यावे लागेल .... " खरं तर हे सांगितल्यावर स्वतः डॉक्टरांनाच कसे तरी वाटले; कारण पुरात गावातल्या बहुतेक गाड्या खराब झाल्या होत्या... नाही म्हणायला प्रतापरावांची   गाडी तेव्हढी वाचली होती.... प्रतापराव आणि रंगराव यांचं वैर तर जगजाहीर होते, त्यातून नुकतीच त्यांच्यातली झालेली चढाओढ याने तर दोघांतील दुहीचा कळसच गाठला होता. अश्या परिस्थितीत प्रतापरावांकडे रंगरावांसाठी मदत मागायची म्हणजे, मदत मागणाऱ्याचीच कत्तल होती. निळकंठ म्हणाला " डॉक्टर...   प्रतापरावांशिवाय कुणाचीच गाडी न्हाय आता .... कसं करावं म्हंता ? " डॉ. राकेश म्हणाले " प्रतापरावांकडे या कामासाठी जायचे म्हणजे ये रे ये

शुभ सकाळ (पूर्वार्ध)

Image
  छायाचित्र : इंटरनेटवरून साभार.  चंद्रमुखी नदीच्या तीरावर वसलेली दोन गावे, कोळसेवाडी आणि चंदनवाडी. खरं तर एका आख्यायिकेनुसार ही दोन्ही गावं एकच होती. चंदनवाडी असंच त्याचं नावं. चंदनाच्या महावृक्षांचे गर्द जंगल असल्यानं त्या गावाचं नाव चंदनवाडी पडलं होतं. कोण्या एका ऋषींच्या शापाने किंवा कोपानं ते जंगल भस्म झालं. भस्म झालेला भाग पुढे कोळसेवाडी म्हणून ओळखला जाऊ लागला.   आजही ती जमीन अगदीच बरड आहे. पण चंदनवाडीची जमीन मात्र चांगलीच कसदार आहे. सत्पुरुषांचे आशिर्वाद जितके मंगलदायी असतात तितकेच त्यांचे शाप दुःखदायी असतात. त्या आख्यायिकेवर विश्वास जरी नाही ठेवला तरीही, एकाच नदीच्या दोन्ही तीरावर जमिनीतला हा फरक हे सुद्धा आश्चर्यच म्हणावे लागेल. चंदनवाडीच्या दोन्ही अंगाला मोकळी पांढरीची मैदाने, एका मैदानात गावदेवीचे मंदिर तर दुसऱ्या मैदानात शंभू शंकराचे; त्याच्या पुढे टेकड्याची पठारे. गावाच्या पुढे असणाऱ्या मोकळ्या जागेत बाजार पटांगण तिथेच जत्रा भरत असे. बाजाराच्या पलीकडे नदी. मुळात दक्षिण वाहिनी असणारी नदी गाव संपता संपता तिच्या उजव्या अंगाला वळसा देऊन, नैऋत्य वाहिनी होत होती. तिच्या अश्य

एक श्रीमंत कलादृष्टी : शिवसृष्टी ! शिवसृष्टी !!

Image
  आज सहकुटुंब आंबेगाव येथील शिवसृष्टी अनुभवली. होय अनुभवलीच म्हणावे लागेल कारण तिथे जे काही निर्माण केले गेले आहे ते अनुभवावेच लागते त्याला पहिले, बघितले अश्या शब्दात बांधता येत नाही.  भव्य असे प्रवेशद्वार, त्याला दिंडी दरवाजा. आतील रचना देखील ऐतिहासीक प्रकारच्या वाड्याचीच.  दगडी कारंजे, ओवऱ्या मोठाल्या पायऱ्या, उबंरठे अगदी कित्येक वर्षे जुनी वाटावी अशीच वास्तू.  पण ही रचना जरी ऐतिहासिक प्रकारची असली तरी, आतील तंत्रज्ञान मात्र अत्याधुनिक पद्धतीचे आणि निदान मला तरी नवखे.  शिवसृष्टीचे प्रत्येक दालन म्हणजे जणू इतिहासाचे हळुवार उलगडणारे पानचं, ऐतिहासिक शस्त्रे, काहीं शस्त्रांच्या प्रतिकृती, इतिहासातील व्यक्तींची अस्सल चित्रे, महाराजांच्या दरबाराची प्रतिकृती, राज्याभिषेक समयी असणारी चिन्हे, आग्र्याहून सुटकेचा आणि अफझल खान वधाचा थरार प्रत्यक्ष पडद्यावर पाहताना अगदी आपण प्रत्यक्षदर्शीच आहोत असेच वाटते. एकंदरीत चित्रे, शस्त्रे प्रतिकृती पाहता हे एखादे पारंपरिक वस्तुसंग्रहालय आहे का ? असे वाचकांस वाटेल परंतु ते तसे नाही.  येथे आपण काही नुसते बघत नाही, तर प्रत्येक बाबीची काटेकोर माहिती, मावळे आ

अनंतवंशज मेथवडेकर - रामदासी

जय जय रघुवीर समर्थ ! काल देशभरात श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली.  जागो जागी श्रीराम प्रतिमा स्थापून सार्वजनिक स्वरूपामध्ये देखील हा उत्सव साजरा झाला.  श्री समर्थ संप्रदायात, श्रीराम नवमी उत्सवाची परंपरा आहे. संप्रदायातील अनेक घराण्यांपैकी एक घराणे म्हणजे, सोलापूर जिल्ह्यात असणाऱ्या सांगोला तालुक्यातील मेथवडे येथील श्री अनंत महाराज  यांचे मेथवडेकर घराणे.  सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या कृपाछत्राची दिक्षा प्राप्त असणारे मेथवडेकर; समर्थ कालापासून श्रीराम नवमीचा उत्सव करत आले आहेत.  सद्यस्थितीमध्ये तब्बल १३ वी पिढी कार्यरत असूनही, हा उत्सव आजही कुटुंबातील प्रत्येक घरी होत आहे.  यंदाच्या वर्षी, हाती आलेल्या माहिती नुसार; मेथवडे, तळेगांव दाभाडे, वारजे माळवाडी, सांगली, लोटेवाडी, धायरी, विठ्ठलवाडी, वाकड, पंढरपूर, बाणेर येथील  मेथवडेकरांच्या विविध घरांमध्ये हा उत्सव पार पडला.  या उत्सवात स्थानिक सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील शेकडो रामभक्तांनी उपस्थिती लावली.  सांप्रदायिक पद्धतीने उपासना, रामनामावली, गुलाल आणि पाळणा असे रामजन्मोत्सवाचे स्वरूप असते.   ३०० वर्षाहून अधिक व